New

येणार कधी तरी सुखाची सकाळ - गौरव वाडेकर


 * सुखाची सकाळ *



कुणी अभंग म्हणे 

कोणी म्हणे गाणी 

सर्वाच्या डोळ्यात असते नेहमीच पाणी 

कधी ते सुखातून वाहते 

कधी वाहते ते दुःखातून....


सुख आणि दुःख पाहून 

नेहमी असेच वाटते..... 

आयुष्य हे असच असते. 

कधी ते पाऊस तर कधी ते वादळ असते....


जरी रात्र दुःखाची असली 

मात्र सकाळ ही सुखाचीच असते 

या दोघां नाही मान्य केल्या शिवाय 

आपल्या कडे कोणताच 

पर्याय नसते.. 

पर्याय नसते..

 कवी - गौरव वाडेकर 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत